ऑनलाईन डेस्क : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नगरपालिका आणि नगर पंचायतीची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली यावेळी सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निकाल २१ डिसेंबरला एकत्र जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला न्यायालयीन वळण मिळाले. परंतु शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने या वादावर स्पष्ट निर्देश दिले. याचिकाकर्त्यांनी मतदान झाले म्हणून तत्काळ निकाल जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती ठामपणे फेटाळून लावत नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवला. एवढ्यावरच न थांबता न्यायालयाने आयोगाला कडक शब्दात निर्देश दिले असून, २० डिसेंबरच्या मतदानात तांत्रिक अडचणी आल्या किंवा मतदान अपूर्ण राहिले तरीही निकालाची तारीख बदलणार नाही. २१ डिसेंबरलाच निकाल द्यावा, असे आदेश दिले आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx