मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ चाअर्थसंकल्प सादर केला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवारांनी महाराष्ट्राचा विकास, पायाभूत सुविधा, शासनाच्या विविध योजना, परकीय गुंतवणूक, आद्यौगिक क्षेत्रातील वाढ यांसह विविध विषयांवर भाष्य केले.
अर्थसंकल्प ठलक मुद्दे
* महाराष्ट्रात देशी-परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात, औद्योगिक विकासात राज्य अव्वल.
* जानेवारी २०२५ मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्र सरकारने एकूण ६३ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले.
* भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचं १५.४ टक्के वाटा
येत्या काळात महाराष्ट्रात १५ लाख ७२ हजार ६५४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार.
* मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच \'ग्रोथ हब\' म्हणून विकसित करण्याचा निर्णय.
* हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे \'अर्बन हाट केंद्रां\'ची स्थापना करण्यात येणार.
* रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत १० हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
* नवी मुंबई येथे २५० एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार आहे.
* हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये ८ हजार ४०० कोटी रुपये किंमतीचा बाह्यसहाय्यित प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
* १० हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा विकास करणार, यातून ५ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे.
* ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही, तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी \"एक तालुका - एक बाजार समिती\" योजना राबविण्यात येणार आहे
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx