अलिबाग : अलिबाग रेवस मार्गावर मानी फाट्याजवळ दुपारनंतर इनोव्हा कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील नवेदर बेली येथील पती-पत्नी असे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक होत रस्ता रोखून धरत कारची तोडफोड सुरू केली. अलिबाग पोलिसांनी जादा कुमक बोलावत परिस्थितीवर नियंत्रण मिळीलवण्याचा प्रयत्न केला.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात जखमी झालेल्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारा पूर्वीच पती - पत्नी चे निधन झाले. नवेदर बेली येथील विश्वास पाटील(वय ४७) व त्यांची पत्नी कल्पना पाटील अपघातात ठार झाले आहेत. अपघाताबाबत अधिक तपास अलिबाग पोलीस करत आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजताच ग्रामस्थानी आक्रमक रूप धारण केले. अपघातग्रस्त कारची तोडफोड केली. तसेच संतप्त जमावाने रस्ता रोखून धरला. सुमारे दोन तास ग्रामस्थानी रस्ता रोखून धरल्याने अलिबाग रेवस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी जादा कुमक बोलावत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx