अलिबाग, दि.२८ (प्रतिनिधी) : अलिबाग जवळ समुद्रात एका बोटीला भीषण शुक्रवारी (दि.२८) आग लागली. सुदैवाने या बोटीतील सर्व खलाशी सुखरूप आहेत. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आक्षी साखर येथील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे. या बोटीमध्ये १८-२० खलाशी होते.
अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भर समुद्रात बोटीने पेट घेतला. आगीत बोट ८० टक्के जळून खाक झाली. बोटीच्या वरील जाळी देखील जळाली आहे. बोटीवर १८ ते २० खलाशी असल्याची माहिती मिळत आहे. बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
* अलिबागच्या मांडवा बंदरात एका खाजगी स्पीड बोटीला २ डिसेंबर २०२३ रोजी आग लागली होती. या अपघातात दोन जण जखमी झाले होते. मुंबई गेटवे येथून मांडवा बंदरात दाखल झालेल्या बोटीला आग लागली होती. त्यावेळी बोटीमधील जनरेटरमुळे आग लागल्याचे समोर आले होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx