अलिबाग, दि.२६ (प्रतिनिधी) :
किहीम समुद्र किनारी मार्च महिन्याच्या सुरुवातीला ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने घरटे करून अंडी घातली होती. या अंड्यांमधून कासवाची ६८ पिल्ले बाहेर आली आली असून, या पिल्लांनी समुद्राच्या पाण्यात धाव घेतली. किहीम ग्रामस्थानी उपस्थित राहून हा क्षण अनुभवला. मागील अनेक वर्षापासून ऑलिव्ह रिडले जातीची कासवं मुंबई आणि अलिबागच्या समुद्र किनारी नाहीशी झाली होती, आजच्या घटनेने येथील पर्यावरणात रक्षणात यश येत असल्याचे दिसून येत आहे.
किहीम समुद्र किनारी मार्च महिन्याच्या सुरुवातीला ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने घरटे करून अंडी घातली होती. यांनतर मागील ५२ दिवस किहिम ग्रामस्थ आणि वनविभागाचे कर्मचारी दिवसरात्र या घरट्यांचे रक्षण करीत होते. या प्रयत्नानं शुक्रवारी सायंकाळी ५ वाजणू दरम्यान घरट्यात हालचाल होत असल्याचे रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर एकएक पिल्लू घरट्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. ८ वाजेपर्यंत ६८ पिल्ले बाहेर आली. या पिल्लांनी सुद्राच्या पाण्याकडे धाव घेतली. यावेळी कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल समिर शिंदे यांच्यासह किहीम ग्रामस्थ. आणखी ६० पिल्ले बाहेर येऊ शकतात असा अंदाज समिर शिंदे यांनी वर्तविला आहे.
पिल्ले बाहेर पडताना घरट्यातील वाळू थोडीशी खचत असल्याचे पिहिल्यानंतर पिल्ले बाहेर येण्याची वेळ जवळ आलेली आहे, हे आमच्या लक्षात आले होते. त्यानंतर ओहटीची योग्य वेळ आणि तापमानाचा योग्य अंदाज घेत ही पिल्ले बाहेर आली होती. साधारण १२० पेक्षा जास्त अंडी एका मादीने घातलेली असावीत त्यामुळे आणखी साधारण ६० पिल्ले बाहेर येऊ शकतात. किहिम ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य होत आहे.
: समीर शिंदे,
वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष अलिबाग.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx