महाड : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी किल्ले रायगडाला भेट दिली. शिवपुण्यतिथीनिमित्त अमित शाहांकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शाहांसोबत फडणवीस, शिंदे, अजित पवारही उपस्थित होते. रायगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमाला शाहांची उपस्थिती होती. यावेळी अमित शाह यांनी जनतेला संबोधित केले.
मी शिवचरित्र वाचलंय. जिजाऊंनी छत्रपतींना स्वराज्याची प्रेरणा दिली. भूमीला स्वतंत्र करण्याचा विचार जिजाऊंनी दिला, बाल शिवाजींना छत्रपती बनण्याची प्रेरणा जिजाऊंनी दिली. म्हणून मी प्रथम जिजाऊंना वंदन करतो. स्वधर्म, स्वभाषेसाठी प्राण पणाला लावणारे अपराजित सैन्य या भूमीला लाभल्याचे अमित शाह म्हणाले.
चारही बाजून आदिलशाही, मुघलशाहीने घेरलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यामध्ये बदलला. अटकपासून कटकपर्यंत हिंदवी साम्राज्य पसरल. हळुहळू स्वधर्माची भाषा लोकांना कळू लागली. एक १२ वर्षाचा मुलगा भगवा पसरवण्याची शपथ घेतो. एका मुलाने संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. छत्रपतींची सेना कटक, कर्नाटकपर्यंत पोहोचली तेव्हा लोकांना विश्वास वाटला की हा देश, धर्म वाचला. स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील तेव्हा भारत विकसित झालेला असेल, याची मूळ कल्पना शिवरायांनी रचल्याचेही ते यावेळी म्हणाले.
शिवचरित्र भारतातील मुलांपर्यंत पोहोचवायला हवं. शिवरायांना महाराष्ट्रापर्यंत सिमीत ठेवून नका. देशासह जगभरात शिवराय पोहोचवायला हवे, स्वभाषा, स्वधर्म, स्वराष्ट्राचे रक्षण त्यांनी केले. गुलामिकतेची मानसिकता त्यांनी तोडली. मी भाषण करायला नाही आलो तर शिवरायांकडून प्रेरणा घेण्यासाठी आलोय, असेही अमित शाह म्हणाले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx