Sunday, June 1, 2025
जगलेल्या कविता कार्यक्रमातून आत्मसन्मानाचा संदेश
जगलेल्या कविता कार्यक्रमातून आत्मसन्मानाचा संदेश...

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते, एम-पूर्व विभाग येथे साहित्यसंपदा निर्मित जगलेल्या कविता हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे १५० महिला कर्मचारी उपस्थित होत्या.


जगलेल्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून कवयित्री सलोनी बोरकर, कवयित्री स्मिता हर्डीकर, कवयित्री वंदना मत्रे, कवयित्री अश्विनी बोलके, कवी मयूर पालकर, कवी लालसिंग वैराट, कवी प्रथमेश कासार या सात कविता सादरकर्त्यांनी विविध सात क्षेत्रातील यशस्वी स्त्रियांच्या यशस्वतेची महती स्वरचित कवितांमधून रुजवण्याचा प्रयत्न केला.


महिला दिनानिमित्त खास पारंपारिक वेशभूषा करीत स्त्रियांनी कार्यक्रमात सहभाग घेत प्रतिसाद दिला. तर काही स्त्रियांनी कार्यक्रम संपण्यापूर्वी मंचावर येऊन जगलेल्या कविता कार्यक्रमासाठी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी साहित्यसंपदा संस्थेतर्फे कोविड काळात तसेच दैनंदिन जीवनात करत असलेल्या सेवेसाठी उपस्थित सर्व महिला श्रोत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल डांगे यांनी केले.


यावेळी सहाय्यक आयुक्त अलका ससाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप कशाळे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. प्रिया कोळी यांचे साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांनी आभार व्यक्त केले.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx