अलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि.१) ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच चारा व वीटभट्टी भिजल्याने शेतकरी व वीटभट्टी चालकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान दिवसभर वातावरण ढगाळ राहिले.
मंगळवारी अलिबाग, मुरुड, पेण, सुधागड, खालापूर, उरण तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या झाडांना कैऱ्या पकडल्या आहेत. पावसाचा कैऱ्याना फटका बसला असल्यामुळे त्यांवर डाग पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच बदललेल्या हवामानामुळे करपा रोगाचा धोका कायम आहे. काजू पिकाचेही थोडे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी गुरांसाठी जमा करून ठेवलेला पेंढा भिजला आहे. तसेच पावसामुळे वीटभट्टी चालकांना फटका बसला. कच्च्या विटा भिजल्या आहेत. यामुळे शेतकरी व वीटभट्टी चालकांचे नुकसान झाले आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx