अलिबाग : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात १० मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्थांच्या थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात.
१० मे रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि अधिकाधिक नागरिकांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष ए. एस. राजदेकर यांनी केले आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx