अलिबाग : राज्य सरकारची आर्थिक परिस्थाती ठीक नसल्याने राज्यभरातील ठेकेदारांची कोट्यवधींची बीले अडकली आहेत. केलेल्या कामांची बिले मिळावित यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने सोमवारी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी लाडक्या बहिण योजनेमुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे कंत्राटदारांनी सांगितले.
लाडकी बहिण योजनच्या अंमलबजावणीसाठी दर महिना ३० ते ३५ हजार कोटी खर्च करावे लागतात. राज्यातील ठेकेदारांचे ४५ हजार कोटी देणे बाकी असताना शासन फसव्या घोषणा करीत असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. केलेल्या वीकासकामांची बिले न दिल्यास ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असे मोर्चेकऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पालरेचा, रायगड विभागीय अध्यक्ष राजू पिचीका, अमीर उर्फ पिंटया ठाकूर, सचिन मोरे, अनिरूध्द पाटील उपस्थित होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx