Sunday, June 1, 2025
दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी झटणारा अधिकारी : डॉ. भरत बास्टेवाड (भा .प्र से ) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड
दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी झटणारा अधिकारी : डॉ. भरत बास्टेवाड (भा .प्र से ) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड...

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचा केंद्र बिंदू असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची डॉ. भरत बास्टेवाड यांनी सूत्र हाती घेतल्यापासून सर्व शासकीय योजना गावागावात पोहचवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे जोर दिला. यामुळे जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण होत आली असून, जिल्हा पाणीदार होत आहे. स्वच्छ रायगड संकल्पना साकारत आहे. शिक्षण, आरोग्य क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून येत आहेत. बेघरांना हक्काचे घर मिळत आहे. महिला बचत गट स्वावलंबी होत आहेत. यासह सर्वच विभागांमार्फत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्याने, जिल्हा विकासाच्या वाटेवर स्वार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

निसर्गतः अपंग अथवा आजार किंवा अपघाताने दिव्यांग झालेले नागरिक हे आपल्या समाजाचे घटक आहेत. त्यांच्याप्रती आदर ठेवणे समाजाचे कर्तव्य आहे. मात्र दिव्यांग व्यक्तींसाठी केवळ कणव, सहानुभूती व्यक्त केली जाते. अशा व्यक्तींना असणाऱ्या समस्या वेगळ्या स्वरूपाच्या असतात. त्यांना स्वतःचे पायावर उभे राहून व्यवसाय करण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाने दिव्यांगांच्या विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना केली असून त्यांच्या विकासासाठी शासनाचे योजनांमधील ५ % प्रमाणे निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. सदरचा निधी अन्य योजनांसाठी खर्च करता येणार नसल्याने जिल्हा परिषदेच्या स्तरावर बऱ्याच अंशी निधी राहील होता.


निकषानुसार दिव्यांगाचे २१ प्रकार असून त्यांचे उन्नतीसाठी दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने (स्कूटी), स्वयं रोजगारासाठी पिठाची गिरणी, झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, मिरची कांडप, दिव्यांग व्यक्तींना विना अट घरकुल  पुरविणे, कर्णबधिर मुलांना वैद्यकीय सुविधा पुरविणे, दिव्यांग व्यक्तींच्या पाल्यांना शिक्षणाठी अर्थसहाय्य देणे यासह इतर अनेक योजना राबविण्यात येत आहेत. तथापि या योजना जिल्हा परिषदेच्या स्तरावर राबवित असताना अनेक योजनांसाठी ५०% अनुदानाची अट घालण्यात आल्याने दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेला ५% निधी मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अखर्चित राहीला असल्याची बाब समोर आली‌. याबाबत डॉ. भरत बास्टेवाड यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता अनपेक्षित माहिती निदर्शनास आली. दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा या ५०% अनुदानावर देण्यात येत असल्यामुळे व दिव्यांग व्यक्ती ५०% लाभार्थी हिस्सा देऊ शकत नसल्यामुळे योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याची बाब समोर आली.

डॉ. भरत बास्टेवाड यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर सन २०२३-२४ पासुन दिव्यांग कल्याण विभागाकडील निधी पुर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी सर्व प्रथम दिव्यांग कल्याण विभागाकडील अनुशेष खर्च करण्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार, दिव्यांग संघटना यांच्यासोबत चर्चा करुन सदरचा अनुशेष हा दिव्यांगांच्या स्वयंरोजगारसाठी कायमस्वरूपी शाश्वत असे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला.

राज्य शासनाच्या दिनांक १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णानुसार सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींसाठी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) ई-शॉप वाहन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतला असून, त्याधर्तीवर जिल्हा परिषदेमार्फत सुद्धा १००%  अनुदानावर अशी वाहने उपलब्ध करून देण्याची नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला.

प्राप्त माहितीनुसार दिव्यांगाच्या २१ प्रकारानुसार रायगड जिल्ह्यात सुमारे २६ हजार दिव्यांग व्यक्ती आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमार्फत तालुकानिहाय दिव्यांग शिबीरांचे आयोजन करण्यात येत असून, दिव्यांग व्यक्तींची शोध मोहिम यापुढे सुद्धा राबविण्यात येत असते . शिबीरामध्ये जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना डिजीटल दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येते. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या योजनांची एकत्रित माहिती पुस्तिका तसेच केंद्र शासन व राज्य शासन दिव्यांगांसाठी राबवित असलेल्या विविध योजना, त्यांचे हक्क, अधिकार यांची माहिती प्रत्येक दिव्यांगांपर्यत पोहचावी या उद्देशाने दिव्यांग कायद्यासह एकत्रित माहिती पुस्तिका जिल्हा परिषदेने प्रकाशित केली आहे. सदरची माहिती पुस्तिका सर्व तालुक्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्हात विविध ठिकाणी समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे असल्यामुळे पर्यटनाशी निगडीत तस
रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तथापि बराच भाग डोंगराळ असल्यामुळे दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहून पर्यावरण स्नेही फिरतेवाहन ई-शॉप वाहन उपलब्ध करून पुरविण्यात येणाऱ्या वाहनाचा आकार भौगोलिक दृष्ट्या कसा असावा? त्या वाहनाची बांधणी कशी असावी? यासाठी लोणेरे येथील शासकीय संस्था डॉबाबासाहेब आंबडकर तंत्रद्यान विद्यापीठ लो ने रे रायगड (BATU) यांचे कडून वाहनात आवश्यक ते बदल करून त्यास परिवहन विभागाकडून मान्यता घेण्यात आली. शासनाच्या निकषानुसार प्रति वाहन ३ लाख‌ ७५ हजार रुपये किंमत निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार जेम पोर्टलवर ई-निविदा प्रसिध्द करून निविदा मागविण्यात आल्या. जेम पोर्टलवर अशी वाहने पुरविण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला असून, न्यूनतम किंमत ३ लाख ५० हजार रुपयांची निविदा अंतिम करण्यात आली. तसेच योजनेसाठी दिव्यांग लाभार्थ्यांकडून अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करून तालुक्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची जिल्हा स्तरावर छाननी करून अत्यंत पारदर्शीपणे पत्रकारांचे उपस्थित लकी ड्रॉ सोडत पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्व प्रक्रीया पारदर्शकपणे पूर्ण करून सोडत पध्दतीने (लकी ड्रॉ) निवड झालेल्या ७१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. फिरत्या वाहनावरील दुकानामुळे दिव्यांगांना रोजगार प्राप्त झाला असून, ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच यापुढेही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकानांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती डॉ बास्टे वाड यांनी दिली आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्कुटी विथ अॅडप्शन या वाहनासाठी ५०% अर्थसहाय्य देण्यात येत होते. त्यामुळे प्रभावीपणे योजना राबविण्यास मर्यादा येत होत्या. त्यामुळे या योजनेमध्ये जिल्हा परिषदेने बदल करून सद्य स्थितीमध्ये दिव्यांगांना (स्कुटी साईड व्हीलसह) खरेदी करण्यासाठी रक्कम १ लाख १० हजार रुपये इतके १००% अनुदान देण्यात येते. या योजनेतंर्गत मागील सन २०२३-२४ वर्षामध्ये ५४ दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.  यापुढेही ही योजना सुरू राहणार आहे

केंद्र शासनाच्या विशेष प्रयत्नातून दिव्यांगांना भारत सरकारच्या ADIP स्कीम अंतर्गत आवश्यक सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याकरीता जिल्ह्यामध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर जिल्ह्यामधील ११ तालुक्यांमध्ये घेण्यात आले. या शिबीरामध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत दिव्यांगांच्या गरजेनुसार त्यांना कोणते उपकरण आवश्यक आहे याची तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये ग्रामीण भागातील १ हजार ६१० दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव देण्याचे प्रस्तावित आहे. त्यांना गरजेनुसार तीन चाकी सायकल, कृत्रिम पाय, ब्लाइंड डिजिटल स्टिक, कानाचे डिजिटल श्रवणयंत्र, कॅलीपर, सीपीचेअर, कुबडया, व्हिलचेअर, मतिमंद मुलांसाठी शैक्षणिक किट, कृत्रिम हात, उच्च शिक्षण घेणाऱ्या १००% अंध दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट मोबाईल फोन, दिव्यांगत्वाचे ८०% पेक्षा अधिक प्रमाण असलेल्या अस्थिव्यंग व्यक्तींना बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल या उपकरणांचा लाभ देण्यात येणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना रोजगार संधी निर्माण व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात अनुदानित २, कायम स्वरुपी विना अनुदानित १०, कार्यशाळा ३ आशा १५ कार्यशाळा चालविण्यात येत आहेत. यापैकी पाच कार्यशाळांना जिल्हा परिषद सेस मधुन ५० लाख रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यशाळांमधील १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी रु ६ लक्ष किमतीच्या कागदी पिशव्या तयार करण्याचे ५ मशिन ५ शाळांना  उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या मशिनच्या माध्यमातून १ ते २ हजार कागदी पिशव्यांची निर्मिती हे दिव्यांग बांधव करत आहेत. या तयार झालेल्या कागदी पिशव्यांना स्वीट मार्ट, किराणा स्टोअर यांच्याकडून मागणी असून, दिव्यांगांना रोजगार निर्मिती झालेली आहे
कर्णबधीर मुलांना ऐकण्याची क्षमता विकसीत होण्यासाठी अत्यंत खर्चिक स्वरूपाची क्वॉक्लिअर इंम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य देखिल देण्यात येते. ही शस्त्रक्रीया ५ वर्षाच्या आतील मुलांवर केल्यास जास्त फायदेशीर आहे असे वैद्यकीय अहवालानुसार कळविलेले आहे. त्यानुसार अलिबाग तालुक्यातील मेढेखार गावातील सारांश प्रशांत ठाकुर या दिव्यांग मुलास विशेष बाब म्हणून ६ लाख ८ हजार रुपये लाभ मंजूर करण्यात आला असून, त्याच्यावर क्वॉक्लिअर इंम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली असून सारांश ला या शस्त्रकिये  मुळे बोलू लागला असून त्याला ऐकायला सुद्धा यावेत आहे . आता ही योजना यापुढेही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. अशा सर्वच योजनांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात दिव्यांग बांधवांचे सक्षमीकरण यशस्वीरित्या करण्यात येत आहे.
एकंदरीत डॉ. बास्टेवाड यांनी उपेक्षित असलेल्या दिव्यांगाचे उन्नती आणि रीजगरनिर्मिती केलेले प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx