ऑनलाइन डेस्क : बलुचिस्तानमधील पाकिस्तानच्या रेल्वेचे अपहरण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बलुचिस्थानमधील बंडखोरांनी पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ९० पाकिस्तानी जवान ठार झाल्याचा दावा बलुच बंडखोरांनी केला आहे.
पाकिस्तानच्या नोशकीजवळ क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यावर रविवारी (दि.१६) झालेल्या हल्ल्यात सात पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत, तर २१ जण जखमी झाले आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बलुचिस्तानच्या या हल्ल्यात सात पाकिस्तानी सैन्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तर बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) मात्र या हल्ल्यात एकूण ९० पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाल्याचा दावा करत आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx