पाकिस्तान : पाकिस्तानमधील बलोच आर्मीने रेल्वे हायजॅक केली आहे. दशतवाद्यांनी रेल्वेतील १२० जणांना ओलीस ठेवले आहे. रेल्वेला अपहरणकर्त्यांकडून सोडवण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानी लष्करातील सहा सैनिकांचा मृत्यू झाला आहे. सैन्य कारवाई केली तर प्रवाशांना ठार करण्यात येईल, असा इशारा बलोच आर्मीने दिला आहे.
ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) चे कर्मचारी आहेत. हे सर्वजण रजेवर पंजाबला जात होते. ट्रेनमध्ये उपस्थित सैनिकांनी कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व ओलीस ठार केले जातील, असा इशारा बीएलएने दिला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx