Sunday, June 1, 2025
बाजारात सुक्या मासळीची मागणी वाढली
बाजारात सुक्या मासळीची मागणी वाढली ...

अलिबाग : मागील काही दिवसांपासून मासळी बाजारात सुक्या मासळीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पावसाळ्यापूर्वी घराघरात सुकी मासळी साठविण्याची तयारी आत्तापासूनच सुरु झाली आहे. त्यामुळे नागरिकांची पाऊले सुक्या मासळीकडे वळू लागली आहेत. मागमीबरोबरच सुक्या मासळीच्या किंमतीतही वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.


रायगडकरांच्या जेवणातील अविभाज्य घटक असणारे मासे पावसाळ्यात मुबलक प्रमाणात मिळत नाहीत. जून व जुलै महिन्यात समुद्रात मासेमारी करण्यास बंदि असल्याने या काळावधीत बाजारात मासळीची आवक कमी असते. परिणामी मासळीचे दरही गगनाला भिडलेले असतात. त्यामुळे या काळावधीत सुक्या मासळीचा खवय्यांना आधार वाटतो. यासाठी एप्रिल महिन्यातच सुक्या मासळीची खरेदी करुन ती घराघरात साठविली जाते. त्यामुळे सध्या बाजारात सुकी मासळी खेरदी करण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येते. सुकट, आंबाड, मोठी वाकटी, छोटी वाकटी, बोंबिल, मांदेली, खाऱी सुरमई, बांगडा, कोळंबी सोड्यांना ग्राहकांची पसंती असल्याचे चित्र दिसून येत आहे.


३५ ते ४० कोटींची उलाढाल

मासळीची मोठी बाजारपेठ म्हणून रायगड जिल्हा प्रसिद्ध आहे. यथील ओळ्या मासळीबरोबरच सुकविलेल्या मासळीलाही मोठी बाजारपेठ आहे. सुकविलेल्या मासळीतून वर्षाला सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयांची उलाढाल होते. डिसेंबर, जानेवारी मध्येच ओळी मासळी सुकविली जाते. स्थानिक बाजारात सुक्या मासळीला किंमतही मिळत आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील सुकी मासळी दलालांमार्फत राज्यभरातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठविली जात आहे.


सुक्या मासळीचे दर

मासळीचे नाव : महिन्यापूर्वीचे दर : सध्याचे दर

सुकट : २७५ ते ३०० : ३५० ते ४००

आंबाड : ३५० ते ४०० : ४५० ते ५००

मोठी वाकटी : ३५० ते २८० : ३०० ते ३२०

छोटी वाकटी : ३०० ते ३२५ : ३७५ ते ४००

बोंबील : ३०० ते ३५० : ३५० ते ४००

मांदेली : १२० ते १५० : २०० ते २५०

खारी सुरमई : ६५० ते ७०० : ८००ते ८५०

बांगडा २५० ते ३०० : ३५० ते ४००

कोळंबी सोडे : १,५०० ते १,६०० : १,६०० ते १,७००

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx