अलिबाग : साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलन अलिबाग येथे नुकतेच पार पडले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे मराठीसाठी झटणाऱ्या आणि मराठी साहित्यक्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या काही निवडक संस्थांचा, लेखकांचा आणि पुस्तकांचा सन्मान सदर साहित्य संमेलनात करण्यात आला. यावेळी राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार २०२५ पुरस्कार मयूर पालकर यांच्या मयूरस्पर्श पुस्तकास बहाल करण्यात आला.
यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख, आदर्श नागरी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी, लेखक रमेश धनावडे, ज्येष्ठ साहित्यिक एल.बी पाटील, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे उपस्थित होते. सदर प्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष किसन पेडणेकर यांनी पुरस्कार विजेत्या साहित्यिकांना शुभेच्छा दिल्या.
मयूर पालकर हे मुंबईतील सांताक्रूझ विभागातील असून अभियंता म्हणून नोकरी करत आहेत. त्यांनी आपल्या लिखाणामागची प्रेरणा त्यांची बहीण आहे असे सांगताना आपल्या मातोश्री कल्पना पालकर यांना पुरस्काराचे श्रेय बहाल केले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx