मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व कॅबिनेट व राज्यमंत्री शाळा भेटी घेणार आहेत. याव्यतिरिक्त सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव पण या मोहिमेत सामील होणार. हा राज्य शासनाचा एक उपक्रम असून, त्यावर १२ मार्च रोजी शिक्कामोर्तब झाले.
१०० शाळांना भेटी देणे असा हा उपक्रम आहे. निर्णयानुसार या सर्व मान्यवरांना २०२५–२६ या शैक्षणिक सत्राच्या सुरवात होण्याच्या पहिल्या दिवशी भेट द्यायची आहे. संबंधित मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेत भेट देऊन हे मान्यवर विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. या उपक्रमाचे नियोजन शिक्षणाधिकारी करतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने या उपक्रमाची आखणी करण्याची सूचना आहे.
संबंधित जिल्हाधिकारी यांना जिल्ह्याच्या पालक सचिवांना अवगत करून नियोजन साधायचे आहे. मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे म्हटल्या गेले आहे. शालेय शिक्षणमंत्री ते जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्यातील सर्व वर्ग एक व दोन या दर्जाच्या अधिकऱ्यांना सोबत घेत यांना जिल्ह्यातील १०० शाळांना भेट देण्याचे नियोजन करायचे आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx