Sunday, June 1, 2025
राज्यात उष्णतेची लाट
राज्यात उष्णतेची लाट...

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून होळीआधीच दुसरी उष्णतेची लाट आली आहे . बहुतांश ठिकाणी पारा ३६ अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. राज्यात सर्वाधिक३८.८ तापमान सोलापूरमध्ये नोंदवले गेले आहे. कोकण व गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत उष्णतेचा येला अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, रायगड पालघर जिल्ह्यातही ही लाट राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.


मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा,विदर्भात तापमानात वाढ झाली आहे तर कोकणात उष्णेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान चढेच असून गेल्या 24 तासांत किमान तापमानात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात किंचित घट झाली आहे. पुढील पाच दिवस मुंबई व उपनगर तसेच कोकणपट्ट्यात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. ११ मार्च पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट असून त्यानंतर हवामान उष्म व दमट राहणार आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx