अलिबाग : मुंबई गोवा महामार्गावरील दुरशेत गावच्या नदीकिनाऱ्यावर महिलेचा मृतदेह बॅगेत कोंबलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात सापडत असलेल्या बेवारस मृतदेहांच्या घटनांवर नजर टाकली असता, रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र हद्दित १ जानेवारी ते ११ मार्च दरम्यान ८ बेवारस मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बेवारस मृतदेहांची ओळख पटवित गुन्ह्यांची उकल करताना पोलीसांच्या नाकीनऊ आले आहेत.
रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरणासोबत नागरिकरण वाढल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाला जिल्ह्यात ७ ते ८ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी होत आहे. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांची दमछाक होत असताना, आत्ता पोलिसांसमोर ठिकठीकाणी बेवारस सापडणार्या मृतदेहांच्या नातेवाईकांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हाण समोर ठाकले आहे. तसेच बेवारस मृतदेहांचे नातेवाईक न सापडल्यास कोही मृतदेहांवर अंत्यसंस्कारही पोलिसांना करावे लागत असल्याचे वास्तवही समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये सध्या बेवारस मृतदेह मोठ्या संख्येने सापडत आहेत. १ जानेवारी ते ११ मार्च दरम्यान रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र हद्दित ८ बेवारस मृतदेह सापडले आहेत. विशेष म्हणजे सापडलेल्या ८ बेवारस मृतदेहांपैकी ४ मृतदेह पेण तालुक्यात सापडले असून, महाड, मुरुड, खालापूर, अलिबाग तालुक्यात प्रत्येकी एक मृतदेह सापडला आहे.
काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता
रायगड जिल्ह्यात सापडत असलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे. एकाद्या व्यक्तिचा खून करुन त्याचा मृतदेह जिल्ह्यातील निर्जन स्थळी टाकण्यात येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी राज्यभर गाजलेल्या शीना बोरा प्रकरणाने हे सिद्ध झाले आहे. शिना बोरा हिची मुंबईत हत्या करुन मृतदेहाची रायगड जिल्ह्यात विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
मृतदेहांची ओळख पटविण्यात का अपयश
रायगड जिल्ह्यात सापडत रायगड जिल्ह्यात सापडत असलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे. एकाद्या व्यक्तिचा खून करुन त्याचा मृतदेह जिल्ह्यातील निर्जन स्थळी टाकण्यात येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच परराज्यातील काही नागरिकही जिल्ह्यात रोजगारासाठी स्थळांतरीत झाले आहेत. यामधील एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची ओळख पटत नाही, यामुळे जिल्ह्यात बेवारस मृतदेह सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.
बेवारस मृतदेहावर अत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पोलिसांवर
सापडलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह हे वैद्यकीय महाविद्यालयाला दिले जातात. ३ ते ७ दिवसात या बेवारस मृतदेहाचे अंत्यविधी करायचे असते. कित्येकदा पोलिसांना तपास करण्यास काही महिने लागतात. परिणामी मृतदेह सडू लागतात. या मृतदेहाचे अंत्यविधी करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. अंत्यविधीचा खर्चही पोलिसांना करावा लागतोे. तर काही वेळेस स्थिनिक स्वराज्य संस्थांची बेवारस मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यासाठी पोलीस मदत घेतात.