अलिबाग : रायगड जिल्ह्यात जागा जमिनींचे व्यवहार पुन्हा जोरात सुरु झाले आहेत. जिल्ह्यात २०२४/२५ या वर्षात दस्त नोंदणीतून ३ हजार ५४४ कोटींचा मुद्रांक शुल्क जमा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मुद्रांक शुल्कात तब्बल ३३८ कोटी रुपयांची वाढ झाली असून, २०२३/२४ या वर्षात दस्त नोंदणीतून ३ हजार २०६ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क जमा झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल, उरण, खालापूर, पेण, अलिबाग, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये जागांचे व्यवहारित्या प्रमाणात सुरू आहेत. मोठ मोठे उद्योजक जिल्ह्यात जागा खरेदी करून, जागा विकसित करण्याकडे त्यांचा कल आहे. यामुळे जिल्ह्यात दस्त नोंदणीतून कोट्यवधी रुपयांचा मुद्रांक शुल्क जमा होत आहे.
२०२२/२३ या वर्षात रायगड जिल्हा २ हजार ४५० कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क जमा.करण्यात आला होता. तर २०२३/२४ या वर्षात ३ हजार २०६ कोटी तर २०२४/२५ या वर्षात ३ हजार ५४४ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क जमा करण्यात आला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx