Sunday, June 1, 2025
विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध महाविकास आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध महाविकास आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ...

अलिबाग : नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी...., झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे...., या घोषणांनी मंगळवारी (दि.२२) अलिबाग शहर दुमदुमून गेले. सरकारने शहरी नक्षलवादाचा विरोध करण्याच्या नावाखाली विशेष जनसुरक्षा विधेयक तयार केले आहे. या विधेयकामुळे जनतेच्या अभिव्यती स्वातंत्र्याचे तसेच अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या विधेयकाविरोधात सर्वत्र सरकारविरोधात असंतोष धुमसत असून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभागी होत विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला.


सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली विशेष जनसुरक्षा विधेयक तयार केले आहे. या विधेयकामध्ये बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटना याबाबतच्या व्याख्या हेतूत अत्यंत ढोबळ ठेवण्यात आल्या आहेत. कोणते कृत्य बेकायदेशी आहे व कोणती संघटना बेकायदा आहे हे ठरविण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आहे. विधेयकानुसार सरकारने बेकायदेशीर म्हणून घोषीत केलेल्या संघटनेच्या सभासद व सहकाऱ्यांसाठी कारावास व लाखो रुपयांचा दंड अशा भयानक तरतूदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या विधेयकामुळे जनतेच्या अभिव्यती स्वातंत्र्याचे तसेच, अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. यामुळे महाविकास आघाडी या विधेयकाविरोधात आक्रमक झाली आहे.


महाविकास आघाडीच्या माध्यमातून विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. सदर मोर्चाची सुरुवात अलिबाग शहरातील शेतकरी भवन येथून करण्यात आली. मोर्चा शेतकरी भवन, काळबादेवी मंदिर, मारुती नाका, इंडस्ट्रीयल हायस्कूल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते.


मोर्चाचे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी केले. या मोर्चात शेकाप महिला आघाडी संघटिका ॲड. मानसी म्हात्रे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, महिला आघाडी जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, शेकाप महिला आघाडी जिल्हा संघटिका चित्रलेखा पाटील, काँग्रेसच्या नंदा म्हात्रे, सर्वहारा संघटनेच्या उल्का महाजन, सोपान सुतार, अनिल गोमा पाटील यांच्यासह हजारो नागरिक सहभागी होणार आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx