Sunday, June 1, 2025
सेल्फीच्या नादात पर्यटक महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू
सेल्फीच्या नादात पर्यटक महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू ...

अलिबाग : श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी  तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर समुद्र किनारी सेल्फीच्या अतिउत्साही नादात एका महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

ठाणे जिल्ह्यातून पर्यटनासाठी नऊ महिला श्रीवर्धन तालुक्यातील  हरिहरेश्वर येथे आल्या होत्या. हरिहरेश्वर येथील एम टी डी सी येथे वस्ती करुन सकाळी हरिहरेश्वर मंदिरात दर्शन घेऊन त्यानंतर समुद्रकिनारी  शुक्ल तिर्थ भुई खोंडी परीसरात  फेर फटका मारण्यात गेल्या असताना . यावेळी समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती लागली होती. अशावेळी उत्साहाच्या नादात सेल्फी काढण्यासाठी पाण्याजवळ जातं असलेल्या काही महिलांना स्थानिक नागरीकांनी  पाण्याजवळ न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र इतर महिलांनी त्यांच्या सूचनाचे पालन केले. मात्र पल्लवी राहुल सरोदे.वय ३७. रा ठाणे.पाचपाखाडी यांनी समुद्र किनारी पाण्याजवळ जाऊन सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही. आणि त्या सेल्फीच्या नादात समुद्राच्या लाटेजवळ जाऊन सेल्फी काढत असताना उसळती  मोठी लाट आली  त्या लाटेबरोबर पल्लवी सरोदे वाहून गेल्या यावेळी स्थानिक बचाव पथकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx