श्रीवर्धन : माणगाव तालुक्यातील साळवे-कोस्ते खुर्द येथील कालभैरव आणि कालेश्री माता यांच्या जीर्ण झालेल्या मुर्त्या विसर्जित करण्यासाठी हरिहरेश्वर समुद्रात घेऊन गेलेला पिकअप टेम्पो समुद्राच्या वाळूत रुतून पाण्यात अडकल्याची घटना सोमवारी (दि.३) घडली. समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकलेला टेम्पो पाण्याबाहेर काढण्यासाठी पिकअपच्या चालकासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले मात्र त्यांना अपयश आले. शेवटी समुद्राला आहोती लागल्यानंतर टेम्पो पाण्याबाहेर काढण्यात यश मिळाले.
सुद्राच्या पाण्यात टेम्पो अडकल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्यांना देखील पिकअप बाहेर काढण्यात अपयश येत होते. पिकअप पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ नये म्हणून किनारी असलेल्या झाडाचा आधार घेत तो मजबूत दोरीने बांधण्यात आला. शेवटी ओहोटी लागल्यानंतर पिकअप यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. या मदत कार्यासाठी साळुंखे रेस्न्यू टीमसह स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx