Sunday, June 1, 2025
५०० विद्यार्थिनींना सायकल वाटप
५०० विद्यार्थिनींना सायकल वाटप...

अलिबाग : सीएफटीआय संस्थेच्या संचालिका तथा शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने शिपिंग कार्पोर्रेशन ऑफ इंडियाच्या मार्फत अलिबाग, मुरूड, रोहा, कर्जत, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील ५०० गरीब, गरजू विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आले. पीएनपी संकुलाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात सायकल वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.


यावेळी शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापक अर्चना मॅडम, रुफीना मॅडम, तुकाराम पाटील, गोपिनाथ गंभे, संदेश विचारे, सुरेश घरत, रोहीनी पाटील, शंकर दिवकर, रुबीना बिरवाडकर, श्रीकांत वारगे, कृष्णा वारगे, आदी मान्यवरांसह अलिबाग, मुरूड, रोहा, कर्जत, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पीएनपी महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सीएफटीआय ही संस्था मिझोरामसह अन्य राज्यात कार्यरत आहे. संस्थेचे कर्मचारी तळागळापर्यंत जाऊन गरीब गरजूंना शोधून त्यांना या संस्थेच्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. संस्थेचा जनतेला फायदा झाला पाहिजे ही भूमिकेतून काम केले जात आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी आदी विविध प्रश्न सोडविण्याची संधी यातून मिळाली आहे. शाळकरी मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा. त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी, यासाठी शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या माध्यमातून शाळकरी मुलींना सायकल देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx